Thursday, September 17, 2009

"स्वराज्याचे तोरण"

"स्वराज्याचे तोरण"


Created on : Year 2003
Created By : Shyam Wadhekar
Language : Marathi
Description : Its about “Chatrapati Shivaji Raje Bhosale”.He had created Maratha kingdom , “Hindavi Swarajya” i.e Maharashtra by defeating Mughal , Vijapurkar , British. This poem will tell you about how he united all maratha youth and how he won his first war at age of only 16 year .. !!!




जुलमी काळोखा त्या मिटवाया
मराठ्याने सिंह मागीला ,
भवानी कृपे जिजाउ पोटी
कारने शीवाबा अवतरला ...

जिजाउ शिकवणी शीवाबा मनी राम कोरीला
दादोजीने त्यात रांगडा योद्धा घडविला ,
मराठ्यांचा भगवा इतिहास ज्याने लिहिला ...

वय सोळव्या राज वैभव सोडूनि
शिवाने एक एक मावळा जोडीला ,
तलवार हाती घेऊनी , रायरेश्‍वरा शपथ खाऊनि
स्वराज्या मनसुबा आखिला ...


गरा गरा फिरवूनि पट्ट्याला
मराठ्याने शत्रू धरणी पाडिला ,
साखळ्या जखडूणी किलेदारला
तोरण्या भगवा फडकविला ...

मोरारजी बेफाम जाहाले पूरंधराला
बाजीप्रभू लढले पावन खिंडीला ,
तानाजी जिद्दीने चढले कोंढण्याला
खुद्द शिवाजीच भिडले सुरतेला ...


एक एक मावळा शर्थिने लढत होता ,
वेळ प्रसंगी प्राणांची आहूत देत
स्वराज्याचा भगवा सह्याद्रीवर फडकवीत होता ..


बड्या गुर्मित शाहिष्त्या खान आला
पुण्यात बोटे गमावून गेला ,
जो म्हणे पकडून आनीतो शिवाजीला
कोथळा धरून लोळवे लागले त्या अफझल्याला ...


मुघल भ्याले ,पळविले नवाबा
आसा गाडी शूर शिवबा ,
स्थापुणी हिंदवी स्वराज्या
हिंदूह्रदयि मान मिळविला !!



- By Shyam Wadhekar

पाखरू

पाखरू


Written in : 2004
Written By : Shyam Wadhekar

Language : Marathi
Description : Its about love. What does mean by true love ? If you like some one truly then don’t think that she should also like you. You have to see life through her eye , think what she like and what she want ? ..Then only she will be happy and ..of course you too. "कुणी आवडल म्हणून ते मिळयलाच हव अस नसत ... तिला काय पाहिजे हेच मला पहाव लागत ...... "



काल एक पाखरू
रानात त्याच घरट शोधताना मी पाहील ,
कसा सांगू त्याला
त्याच घरट पडताना मीच पाहील ...


प्रेमाने सारे आपलेसे वाटतात
आविश्वासने मात्र सारे क्षीतिज्या प्रमाणे वाटतात ......

मागाताना सारे
स्वता साठी काही तरी मागतात ,
मिळयच नसत ते
मग स्वप्न तरी का बर दिसतात .....


मला मिळाल नाही
कारण स्वप्न फक्त एकच उरल होत ,
का कुणाच टाउक पण त्या वरही
आंदुकस नाव तुझच कोरल होत .....



कुणा तरी एकालाच मिळनार
त्याच्याच चेहरायावर हास्य फुलनार ,
शेवटच म्हणून तुझ्याच चेहरायावर हास्य मला पाहाचय
हेच मी तिथ मागीतल होत.....!!!!!


-Shyam Wadhekar

यादे

यादे


Created By : Shyam Wadhekar
Language : Hindi
Description : Its about memories of those sweet people , who were in my life for very short period of time.But are still having place in my heart …… and will be always there !!



फुलो से दिन
वो चंद मुलाक़ाते ,
हसता मुस्कुराता देख आपको
गुजरती थी वो राते !!

नज़ारो का नज़ारो से मिलना
देख अन देख आपका मुस्कुराना !
लगे जैसे सागर की लहरो का
किनारों से मिलना !!

बीती यादे याद कर डरता है दिल
नज़र आपसे मिलाके मुखरता है दिल !
ना जाने फिर भी क्यू
प्यार आप से ही करता है दिल !!

सोचा अब बता ही दू
दिले हाल सुना ही दू !
सागर की प्यासी लहरो को
किनारो से मिला ही दू !!

पर दिल की बात
जूबा पे न ला सका !
झिलमिलाती आपकी आँखो मे
जवाब भी न पढ़ सका !!

" कभी कभी भगवान जी किसी का साथ बहुत कम समय का लिख देते है .. पर वो पल , वो लोग हमेशा के लिए दिल मे बस जाते है ... ..इसलिए..
"

जब भी आपको सोचा
आँखो को बंद किया
!
बीती यादो के दरमिया
हमेशा आपको दिल के करीब पाया !!

By : Shyam Wadhekar

हिंदू ह्रदय

हिंदू ह्रदय


Created By : Shyam Wadhekar

Language : Marathi

Description : This poem tell you about what an Hindu heart think. If you have pride about your culture , your religion then it doesn’t mean that you hate others. Try to understand difference in "स्वाभिमान " and "धर्मआन्धळेपणा ".You have no rights to hide behind "सर्व धर्म समभाव ".... Every one should give equal importance to their own culture, religion.



निळ्या ध्वजाचा आम्हाला द्वेष नाही

हिरव्याचा आम्हाला राग नाही ,

पण भगव्या ध्वजाचा आभिमान

आम्हाला कधी लपनार नाही ......!!


नक्कीच मस्स्जिदि बद्दल वाईट नाही

मनात चर्च बद्दल अवमान नाही,

पण शिवरायांपुढे नतमस्तक होण्यास

कुणी आम्हा रोकु शकणार नाही ..... !!


सर्व धर्मीयांचा मान राखु

त्यांच्याशी प्रेमानेच वागू ,

पण हिंदूस्थानातच "आम्ही हिंदू"

गर्वाने सांगावायास बंदी का लाउ .... !!



नक्कीच भगवा वाघ पुढे सरसावणार

थिजलेल्या हिंदवी रक्ताला नवचैतन्य लाभणार ,

जिजाउ शिकवणिने पुन्हा शिवबा घडणार

हिंदवी स्वराज्याचा खातमा करू पाहणार्‍याचे स्वप्न नाही पुरे होऊ देणार ...

नाही पुरे होऊ देणार ... !!!


-By Shyam Wadhekar

पावसातली आठवण

पावसातली आठवण


Created By : Shyam Wadhekar
Language : Marathi
Description :
If you are in deep love and if it comes to rainy season .... then what happens to you ... I think it should not be required to tell you explicitly.








वार्‍याची कोवळी झुळुक
अंगाला शहारून निघते ,
नाही नाही म्हणत मग मनही
जुन्या आठवणी उजाळत निघते ....


आठवण आली म्हणजे
तुझे हास्य डोळ्यापुढे झीलमिलते ,
काळाच्या पडद्याआड़ कोमेजलेल्या
फुलाना पुन्हा नवी पालवी फूटते .....


कधी हसवते कधी रडवते
क्षण क्षण करीत चिम्ब भिझत राहाते ,
पाण्यात वाहून जाणार्‍या आठवणी साठवन्यासाठी
मग मन मात्र सतत धडपडत राहाते ...



विजेच्या कड कडाटाने मग भानावर येते
डोळ्याच्या पापनितल पाणी पुसत ,
तू नेहमी हसत राहावी
हेच पावसाच्या प्रत्येक सरीला मागत राहाते ....
मागत राहाते ....!!!

- By : Shyam Wadhekar

My Kind Of Girl

My Kind Of Girl


Created By : Shyam Wadhekar
Language : Hindi
Description : You may fall in love at first glance itself. Why you like her ? Don’t know ? How she is different from other ? Don’t Know…you only know that you like her ..that’s it. You will try hard to find her … but :( … Still your heart will say that.. she will be back … some time some , where.. Because she is made for you !!!




आँखो मे लेके आसमा सी गहरई
बिन बोले कुछ बोल गयी वो ,
कसक सी कुछ दिल मे घोल गयी वो
जो कल नज़ारो से मेरे गुजर गयी वो .. !!

बैचैन होके मै धुन्ड़ता ही रह गया
नजरो को कही वो ना मिली ,
पर हवाओ मे खुशबू कह रही थी
कही ना कही खिली है आज भी वो कली .. !!

धरती पे चढा दुल्हन सा साज
बादलो ने भी खोले दिल के सारे राज ,
बरसों से जो एक चेहरा सपनों में था
लगा जैसे धरती पे उतरा है आज ...!!

होगा ऐसा भी एक दिन
फिर किसी मोड़ पे टकराएगी वो ,
कहता है दिल हर घड़ी हर पल
ज़रूर मिलेगी मुझे वो मेरी .. My Kind Of Girl !!!!


-By : Shyam Wadhekar

शिवजन्माची पहाट

शिवजन्माची पहाट



Created By : Shyam Wadhekar
Language : Marathi
Description : This poems describes the first rising day of Maratha History , i।e the day of Chatrapati Shivaji's birth on fort shivneri.


सूर्यकीरणे गारव्याला होती जाळत
शिवनेरीवर भगवाही होता खेळत ,
येणार्‍या नव्या पर्वाची लागली होती चाहूल
शिवजन्मान पडणार होत पहिल मराठी पाउल ...


मराठ्यांचा प्रत्येक आश्रू
जिजाउन साठवला होता ,
आई भवानीस तेच आश्रू देऊन
पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता ...


मंदिर थराराली , शिवनेरीची तोफ कडाडली
वार्‍याची कोवळी झुळुक दर्‍या खोर्‍यात दरवळली ,
जिजाउपोटी मराठ्यांचा राजा अवतरला
सांगत मुकी पाखरही किलबीलली ....


नगारा वाजला ,शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला ,
आता सह्याद्रीवर भगवा फडकनार
मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकनार ....


इतिहासच पाहील पान
शिवजन्मान लिहाल गेल होत ,
हिरव्या दगडावर आता भगवे रक्त
स्वराज्याचा इतिहास कोरत होत ...


By : Shyam Wadhekar

आई - By Shyam Wadhekar

आई

आठवण तिची येता
काळिज माझ हेलावत ,
कुशीत आईच्या जाण्यास
मन माझ तळमळत ....!!

माझ ते लाडावन
आईच मात्र प्रेमानेच रागावन ,
इवल्या जिवासाठी आईच तळमळन
आंधार मिटवाया जस वातीच ते जळन ... !!

गुलाबाच्या फुलात ,पाकळ्यांच्या सुखात
आईन मला वाढवलाय ,
प्रेम देत दुसर्‍यासाठी जगायाच
हेच आईन मला शिकवलाय ... !!

आईवीना जग सार पेटावस वाटत
आयुष्या सार आईसाठीच जगावास वाटत ,
मरून आई पोटी तेच बालपण
पुन्हा पुन्हा खेळावस वाटत ...!!

- By : Shyam Wadhekar

Monday, September 7, 2009

kahi charolya !

तोडून जाताना बंध हे, आठवणार तर आहे खूप काही;
पण, कंठ दाटून येईल अशी आठवण, फक्त तुझा सहवास!
- प्र.बा.

दाटून आठवण येता, मी डोळे मिटून घेतो
कधी तुला आठवतो, अन् तुझ्यात हरपून जातो.
- प्र.बा.

Wednesday, July 15, 2009

मोहीम - शिवतीर्थ किल्ले राजगड

या पावसाळ्यात काय काय करायचे हे अगदी आधीपासूनच मना मध्ये ठरलेलेल .. मग काय पहिला पाऊस होताच टाकला एक इ मेल, जिजाउ.काम च्या कार्यास जेंव्हा सुरुवात केली तेवाच मनी एक ठरले होते कि महाराजांच्या, मा साहेब जिजाउच्या आयुष्यात अनेक क्षणी साथीदार साक्षीदार असलेल्या त्या आमच्या अभेद्य गडकोट किल्ल्यांना भेट द्यायची ..

मग ठरले तर, मोहीम शिव तीर्थ किल्ले राजगड ..... शिवाजी महाराजांची पहिली राजधानी, याच किल्ल्या वरून महाराजांनी २४-२५ वर्षे स्वराज्याची कामे पहिली, अनेक महत्वाचे निर्णय, अनेक मोहिमांची सुरुवा
त तथा विजयी सांगता याच गडावर व्हायची.

राजगड - म्हणजे गडांचा राजा.. खरोखरच ह्या किल्ल्याचा इतिहास बघितला असता हा खरच सर्व किल्ल्यांचा राजाच आहे. पूर्वी ह्या किल्ल्याचा डोंगर मुरुंबदेवीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता. शिवरायांनी याच डोंगराचे महत्व ओळखून त्यावर आतिशय कठीण चढणीचा तथा दुर्गम आणि एक भक्कम असा किल्ला बांधला किल्ले राजगड.

मग कित्येक मेल नंतर सारा प्लान तयार झाला .. ठरले तर मग गाठायचे किल्ले राजगड.. सर करायचे महाराजांच्या या पहिल्या राजधानीला .. मग काय गाड्या काढल्या ... मी, श्याम, तानाजी, केदार, दत्ता , सुधाकर (झोड) , किशोर, अरविंद , सुनील, सन्नी (भूषण), मिसाळ काका (काका या साठी कि एकमेव लग्न झालेले), गणेश, आणि वैभव या १३ जणांची मोहीम निघाली पहाटे ठीक ६ वाजता .. ठिकाण कर्वे नगर, पुणे.

सर्वांच्या मुखावर एक प्रचंड उत्साह दिसत होता.. कारण कित्येक दिवसांनी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा हा प्रसंग, पण त्या हि पे
क्षा हा उत्साह होता तो शिवरायांच्या त्या पवित्र भूमीस आपला स्पर्श होणार ह्या विचारांनी.

बरोबर ६ वाजता आम्ही कर्वे नगर सोडले .. मुंबई - बंगलोर या हाय वे (एन एच -४) ने सरळ निघालो . ७ गाड्या आणि १३ लोक ... सकाळच्या त्या फ्रेश वातावरण मध्ये मन आगदी आनंदाने भरून वाहत होते .. गाड्यांचा वेग जसा वाढायचा तसा आमचा उत्साह हि ... खरोखरच पुण्याला एक अलभ्य देणगी लाभली आहे ती म्हणजे सभोवतालच्या उंच उंच पर्वत रा
गांची .. सकाळचे धुके .. त्या मधून दिसणारी ती हिरवीगार डोंगर रांग.. एका वेगळ्याच विश्वात आम्हाला घेऊन जात होती .. पुढे येणारा कात्रज चा बोगदा .. सकाळच्या वेळीचे ते विहंगम दृश्य बघून सर्वाना एवढ्या पहाटे उठवल्याचे जे शल्य होते ते केव्हाचेच निघून गेले...

याच हाय वे चा आनंद घेत आम्ही जवळ पास २० किमी सरळ आल्यावर रस्त्यात भेटणाऱ्या वाट्सरुकंडुन चौकशी केली .. समोर नसरापूर फाटा लागताच आमच्या गाड्या उ
जवी कडे वळल्या .. समोर एक मोठा फलक लागलेला होता .. राजगड २० किमी. सर्वाना खूप आनंद झाला कारण राजगड आपल्या एवढ्या जवळ असेल याची कल्पना कोणी केली नव्हती, याच वाटे वरून कित्येक वेळा आपण गेलेलो पण ह्या शिवरायांच्या अनमोल ठेव्यास कधी बघितलेच नाही असे चुकून वाटून जाते.

मग हाय वे सोडून वाट लागते ती एका सुंदर डांबरी रस्त्याची .. रस्ता तसा अरुंद पण चांगला .. दुतर्फा शेती ची कामे चालू होती .. पावसाने तर आम्हाला केव्हाच गाठले .. जणू तो आमचे शिवरायांच्या राजधानीत स्वागतच करण्या साठी आमची वाट बघत होता. हिरवी गार गर्द झाडी बघून मन अगदी फुलून जात होते .. रस्त्यावरून चालताना लहान लहान मुलांची शाळेला जाण्याची धडपड पाहून पुन्हा एकदा आमच्या शाळेचे दिवस आमच्या डोळ्या समोर आले.. जोराचा वारा.. आणि पाऊस या मुले आम्ही पूर्ण भिजलो .. कल्पना आली आता पुढील वाटचालीची .. म्हणून थोडा थांबा घ्यावा असे वाटले .. पण समोर फ़क़्त दिसत होते सह्याद्रीच्या त्या अभेद्य अशा पर्वत रांगा. पुढे मार्गासनी हे गाव लागते तेथून डावी कडे गेले असता गुंजवणे हे गाव आहे, इथूनच आम्ही आमच्या गड सर करण्याला प्रारंभ करणार होतो.. कुठे हि न थांबता गुंजवणे गाव गाठायचे ठरले .. पण एक छान रस्ता लागला .. दुतर्फा गर्द झाडीच झाडी .. समोर एक नदी तुडुंब भरून वाहत होती .. आपोआप आमचे पाय तेथे रोखले गेले .. हे निसर्गाचे सुंदर रूप खरच आम्हाला चुकवायचे नव्हते .. सर्वांच्या गाड्या थांबल्या. सर्व जन डोळे भरून बघत होते ते सुंदर असे दृश्य .. समोर उंच पर्वत रांगा .. आजू बाजूला फुलांची झाडी .. समोर नदी .. खरच कित्ती सुंदर आहे आपला निसर्ग, तेव्हा आपल्याला जाणीव होते कि आपण शहर मध्ये राहून पैसा तर कमावतो पण कित्ती गोष्टीना आपण मुकतो.

लगेच पुन्हा एकदा एक छोट फोटो सेशन झाला .. नेहमी प्रमाणे पाटील साहेबांचा पुढाकार होताच.

ते दृश्य आपल्या डोळ्या मध्ये सामावून मोहीम पुढे निघाली .. वळणा वळणाच्या रस्त्यातून .. चारी बाजूनी झाडी झुडपांनी वेढलेले गुंजवणे गाव आले.


छोटासाच पण आगदी टुमदार असा हे गाव, गाड्या पार्क करून सर्व जन शोधात होते ते चहा चे हॉटेल .. एक छान से हॉटेल सापडतच सर्वांचा मोर्चा आत वळला .. हॉटेल छोटेच पण मधले वातावरण आगदी सुरेख :) .

लगेच घाई घाई मध्ये आम्ही पोहे आणि चहा चा आस्वाद घेतला आणि एका अवघड प्रवासाला सुरुवात केली .. या आधी पायथ्याशी असलेल्या शिव मंदिराचे दर्शन घेतले .. समोरचा भयानक डोंगर बघून खरच गरज भासली याची..

राजगडावर जाण्या साठी आमच्या माहिती मधले २ रास्ते आहेत , एक म्हणजे गुंजवणे गावातून जाणारा.. आणी एक म्हणजे मार्गासनी या गाव वरून सरळ समोर पाली या गाव कडून .. पाली च्या मार्गे रस्ता थोडा सुकर.. असा म्हणतात

पण गिर्यारोहकांसाठी तथता शिव प्रेमींनी गुंजवणे गावातूनच जावे असे मी त्यांना सुचवू इच्छितो.

आमची मोही
म निघाली ती गुंजवणे गावातून, सर्व मावळ्यांनी कंबर कसली .. कारण पुढे होती एक कठीण आणि खडतर चढाई .. आमच्या सोबत आमचे मित्र सुनील केदार हे हि होते, एका पायाचा प्रोब्लेम असल्या मूळे त्यांची काळजी सर्वांनाच पडली .. पण जे हार खातील ते आमचे केदार साहेब कसले .. लगेच त्यांनी पायाची चप्पल काढली आणि पूर्ण गड अनवाणी पायांनी सर करण्याची इच्छा मनोमनी ठरवूनही टाकली. पाऊस चालूच होता .. सुरुवातीची वाट तशी सोपीच पण खूप घसरणीची म्हणून आगदी काळजी पूर्वक आम्ही निघालो .. एक मेकांना हात देत, साथ देत.

सुरुवातीला सोपी वाटणारी हि वाट पुढे अजून कठीण आणि खडतर होत जाते .. पण पावसाचा हि जोर वाढत होता .. तसाच आमचा जोश हि .. कारण होते जय भवानी - जय शिवाजी या घोशाचे ... समोर संपूर्ण धुके
.. उंच आणि हिरवी गर्द डोंगर रांग त्या वर असलेले ढंगाचे थवेच्या थवे.. मधेच या ढगांतून एखादा उंच डोंगर जणू सूर्यालाच गवसणी घालत होता .. आम्ही उंच उंच जाऊ तसे हे सगळे दृश्य बघून आमच्या डोळ्यांची पारणे फिटले .. उंच उंच ढगांतून पडणारे पावसाचे पाणी आम्ही आमच्या याच डोळ्यांनी बघत होतो .. खाली असणारी शेती त्यात साचलेले पाणी .. खरोखरच हे सगळ दुर्मिळच

पुढे झाडा झाडातून अवघड वाट काढीत काढीत आम्ही पुढे सरकत होतो .. खूप वेळ चालल्या नंतर ढगांनी थोडी वाट दाखवली .. आणि आम्हा
ला कळून चुकले कि आमचे उद्दिष्ट्य अजून खूप दूर आहे .. ढगांनी बाजूला सरकताच एक उंच डोंगर दिसला .. सर्व प्रथम बघून मना मध्ये एक धसकि भरली एवढा मोठा डोंगर सर करावयचा आहे अजून, पण असे हिम्मत हरतील ते आमचे मावळे कसले .. थोडी विश्रांती घेताच पुन्हा ती खडतर वाट पकडली.

बराच वेळ चालल्या नंतर समोर खूपच कठीण असा मार्ग दिसला, बघता क्षणी वाटले .. बाप रे हे आता कसा? पण लगेच आमचे २ -४ मावळे पुढे सरसावले आणि सरा-सरा ती कठीण वाट चढून पुढे गेले.. मागे असलेल्यांना सूचना करत .. त्यांना हात देत आम्ही तो अवघड ट्रेक पार केला .. समोर दिसायला लागला तो चोर दरवाजा.. अरुंद आणि एका वेळेस एकाच मनुष्य जाऊ शकेल एवढा .. पण तो चोर दरवाजा गाठणे म्हणजे मोठा दिव्यच होता .. आता ते पण जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांमध्ये पार पडला .. आणि एक एक करून सारे जन चोर दरवाज्यातून आत आले.

अखेर सर्वांनी यशस्वी रित्या संपूर्ण ट्रेक पार पडली.. यात सर्वात विशेष म्हणजे आमचे केदार साहेब.. गेल्या गेल्या न कळतच सर्वांच्या तोंडून उद्गार आले ..केदार साहेबांचा विजय असो .. खरोखरच त्यांनी केलेले काम हे खूप धाडसी. आमच्या पाया मध्ये ट्रेक चे शु असून सुद्धा आमचे हे हाल झाले त्यांनी तर अनवाणी पायांनी हि खडतर वाट पार पाडली, मला खात्री आहे राजे स्वतः असले असते तर त्यांनी आमच्या केदार साहेबांचा योग्य तो सन्मान केला असता ... खरच कमाल आहे आमच्या केदार ची आणि त्याच्या शिव प्रेमाची.

चोर दरवाज्यातून आता येताच पद्मावती माची लागते .. वि
स्तीर्ण आणि पसरट असलेली हि माची आहे. चोर दरवाज्यातून अथवा पाली च्या मार्गे आले तरीही सर्व प्रथम आपण याच माचीवर येतो . या माचीवरून एकदा सभोवताली बघितले तर आपल्याला जाणीव होते आपण कित्ती वर चढून आलो आहोत याची . विस्तीर्ण अशा या माचीवर भरदाव वारे वाहत होते .. या वार्या सोबत आपण हि वेगाने सर्वत्र धावत सुटावे असे वाटत होते .. सार काही खूप छान वाटत होते, पद्मावती माची ला दगडांची बांधणी होती.. अशाच एका टोकाला मी धावत गेलो.. खाली असलेली हिरवळ आणि खोल खी बघण्या साठी.. एक खूप छान धबधबा दिसला .. गडावरचे सारे पाणी एका वाटेने खाली पडत होते .. खूप सुरेख देखावा होता तो.. लगेच सर्वांना आवाज दिला सर्व जन धावत आले.. खाली वाकून बघताना खरोखरच ते सुंदर धबधब्याचे सृष्या बघून सर्व जन असलेला थकवा एका क्षणात विसरून गेले ... ते धबधब्याचे पाणी जोराच्या वार्याने उलटे गडावर येत होते .. त्याचे थेंब आपल्या तोंडावर येताच सर्व लोकांचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला...

पद्मावती माची वर येताच दर्शन होते ते शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा संभाजी राजांच्या मातोश्री सइ बाइ यांची समाधी.. त्या थोर शंभू राजस जन्म देणारी ती जननी .. तिच्या पायाशी आमचे शीर हजार वेळेस झुकले .. पण या समाधीची असलेली अवस्था पाहून मन खूप खिन्न झाले .. स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतीच्या आई ची समाधी आशा सामान्य अवस्थेत .. आज आमच्या इथे कर्म कांडाच्या नावाखा
ली लाखो रुपये मंदिरे उभारण्यात जातो आणि आमच्या स्वराज्यास आपल्या पोटचा गोळा अर्पण करणाऱ्या त्या थोर मातेची समाधी अशा अवस्थेत बघवत नव्हती, जशा जिजाउ तशाच महाराणी सइ बाइ .
तिथून दर्शन घेऊन समोर असलेल्या पद्मावती देवीच्या मंदिराकडे आम्ही कूच केली .. बाहेरून दर्शन घेतेले. पण रात्रीच्या मुक्कामी येणाऱ्यासाठी राहण्याची म्हणून खूप चांगली व्यवस्था इथे होऊ शकते।

पद्मावती मचिवाराच एक छान सा तलाव आहे ॥ त्याचे नव पद्मावती तलाव असे आहे। पवासमुले हा तलाव सुद्धा भरून वाहत होता.

पुढे नजरेस पडते ती महाराजांचा राजवाडा.. सध्या पडझड झाल्यामुळे सध्या त्याचे फ़क़्त अवशेष दिसून येतात, तरीही त्याच्या भव्यतेची कल्पना मनाला स्पर्श करून जातेच. ह्याच राजवाड्यात राजाराम महाराजांचा जन्म झाला, शहाजी राजांच्या मृत्यू नंतर मा साहेब जिजाऊ यांना त्यांच्या निर्णयापासून शिवबांनी परावृत्त केले ते इथेच, आशा अनेक ऐतिहासिक क्षणाचा साखीदार राहिलेला हा राजवाडा.

पुढे राजवाड्यातून बाहेर पडताच समोर येते ती महाराजांची सदर, "राजसदर" . याच सदरेवारती स्वराज्याचे महत्वाचे निर्णय घेतले जात, कित्येक महत्वपूर्ण निवाडे याच सदरेवर बसून महाराज करीत असत. खरोखरच ती सदर बघून असे वाटले आपले पण गाऱ्हाणे महाराजांच्या समोर मांडावे. महाराज नक्कीच मला योग्य दिशा दाखवतील ..
पुढे सदरेच्या बाहेर एक निशानाची जागा आहे .. इथेच स्वराज्याचे भगवे निशाण आगदी डोलाने फडकत असेल ... आणि इथूनच दिल्लीच्याही पातशहा ला आव्हान देत असेल .. आज काल इथे स्वातंत्र्य दिनी
आणि प्रजासत्ताक दिनी तिरंगा तसाच मानाने फडकत आसतो.

सदरेवर बराच वेळ शिव काळाचा अनुभव घेतल्यावर समोर दिसत होता तो बालेकिल्ला, आता पर्यंत खूप ऐकून होतो कि अतिशय कठीण चढणीचा हा बालेकिल्ला आहे .. आमच्यातले केदार .. दत्ता यांनी लगेच पुढे न येण्याचा सांगितले.. सोबत आमचे सन्नी म्हणजेच भूषण यांनी पण आराम करण्याचे ठरवले.. सुनील हसबे पण दत्ता ला सोबत म्हणून थांबले ...

बाकीचे मावळे काही केल्या थांबणार नव्हते... उत्साह काही केल्या कमी होत नव्हता. पुढे वाटचाल सुरु झाली ती बालेकिल्ल्याची .. खूपच अवघड अशी हि वाटचाल होती.. काळजी पूर्वक आम्ही एक एक अवघड चढाई पार करत होतो .. मध्ये येणारे सुंदर दृश्य कॅमेरा मध्ये टिपण्याचा प्रयत्न हि करत होतो. धुक्यामुळे वाट अजून कठीण वाटत होती, अरुंद वाट .. धुवाधार पाऊस .. आणि जोराचा वारा .. पण कशाचीही तमा न बाळगता आम्ही पुढे चालत होतो .. निसर्ग जेवढा सुन्दर आहेत तेवढाच तो भयावह हि आहे याची कल्पना आम्हाला इथे आली. कित्येक अडचणींना मात करत आम्ही गाठला बालेकिल्ल्याचा दरवाजा .. या दरवाजा जवळची वाट खूप कठीण आहे.. थोडा जपूनच हि शेवटची वाट पार पदवी लागते.

एक ब ला मोठा बालेकिल्ल्याचा दरवाजा.. आमचे स्वागत करत होता.. याच बालेकिल्ल्याच्या दरवाजा जवळ अफजल खानाचे मुंडके दफन करण्याचा आदेश आउ साहेबांनी दिला होता ... याच दिवशी मराठ्यांचे सत्व जागे झाले होते.. त्यांच्या स्वाभिमानाची जान त्यांना झाली होती.. त्या अभेद्य अशा दरवाजा जवळ जाताच आमचे उर फुलून आले .. तोंडात एकाच घोषणा होती जय भवानी- जय शिवाजी .. एकाच नारा .. मा साहेब जिजाउ कि जय .. हाता मध्ये भगवा .. आणि उरामध्ये प्रचंड स्वाभिमान ...

बालेकिल्ल्याच्या आत येताच एका वेगळ्या विश्वात गेल्याची जाणीव होते .. सर्व सुख दुख पासून दूर.. आगदी वेगळ्या विश्वात .. इथून जग कित्ती छोटे दिसते .. सर्वत्र धुक्याचा साम्राज्य होता .. अन्यथा याच बालेकिल्ल्यावरून सिंहगड, रायगड, तोरणा असे अनेक गड दृष्टीस पडतात .. खरच महाराज याच बालेकिल्ल्यावरून सबंध स्वराज्यावर कशी देखरेख ठेवत असतील याची कल्पना येते .. बालेकिल्ल्यावर उभे राहिल्यास असे वाटते जणू गरुड भरारी घेण्या साठी हे आसमंत आपल्याला बोलावत आहे .. एका उत्तुंग शिखरावरती आम्ही पोचलो होतो याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

बालेकिल्ला हा पद्मावती माची पासून १.५ किमी वर. जवळ पास ४०-४५ मिनिटांचा वेळ लागतो.. पण कोणी हि चुकवू नये आशीच हि ट्रेक. वर बालेकिल्ल्यावर सुद्धा असलेली व्यवस्था पाहून खरोखरच नवल वाटते .. राजवाड्याचे अवशेष आज हि इथे आहेत , सन १९४९ पर्यंत हा राजवाडा चांगल्या अवस्थेत होता . त्याचे खांब उभे होते .. नंतर वादाळा मध्ये त्याला खूप नुकसान झाले. पण तरीही याची भव्यता लपून राहत नाही. पुढे दारू गोळ्याचे कोठार .. एवढ्या वर रक चंद्र कृती आकाराचा छोटासा तलाव .. त्याचे पाणी पिण्या योग्य.

अगदी वेगळ्या अश्या त्या विश्वातून आम्हाला कोणालाच जावे वाटत नव्हते. बालेकिल्ल्यावर येऊन आमची मोहीम सार्थकी लागल्या सारखे वाटत होते .. वेळेची कमी आणि खाली आमची वाट बघत असणारे आमचे साठी या मूळे आम्ही लवकरच बाले किल्ला सोडण्याचे ठरवले.

हा बालेकिल्ला चढायला जेवढा अवघड तेवढीच काळजी तो उतरताना घ्यावी लागते अन्यथा केव्हा तुम्ही खाली याल हे कळणार पण नाही .. तीच काळजी घेत घेत आम्ही बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली.

खाली येताच पोटात कावळे ओरडत होते .. लगेच आमच्या प्रशांत मिसाळ काकांनी आणलेल्या दशम्या सोडल्या .. सोबत आगदी मस्त असा ठेसा .. आह्ह खरच काय मज्जा आली ते जेवताना.. मस्त पैकी खाऊन पिऊन झाल्यावर खाली उतरण्याचे ठरले ...

वेळेच्या अभावी आम्ही संजीवनी माची आणि सुवेळा माची ह्या दोन महत्वाच्या माच्या नाही करू शकलो .. खर तर ह्या पण गडाच्या दोन महत्वाच्या जागा .. पण धुक्यामुळे आणि पावसामुळे आम्हाला खूप वेळ लागत होता म्हणून आम्ही गड सोडण्याचे ठरवले .. खर तर इथून जावच वाटत नव्हते पण सगळे सोबत होते .. पण नक्कीच आम्ही परत ह्या दोन जागांना भेट देणार हे ठरवून आम्ही निघालो आमच्या परतीच्या वाटेवर.

पावसाचा जोर थोडा कमी झाला होता .. निसर्ग रम्य ठिकाणाचे फोटो घेत घेत आम्ही वाट उतरत होतो. जी वाट चढताना काही वाटले नव्हते तीच वाट आता उतरताना मात्र खूप मज्जा येत होती .. कारण पावसामुळे सगळी वाट हि निसरडी झाली होती .. एकमेकांना पकडत.. कसे तरी वाट उतरत होतो .. त्यात आमच्या केदार साहेबांनी काय काय सोसले असेल देवच जाने .. पण कधी पाऊस कधी वारा याचा सामना करत आम्ही गड उतरत होतो मध्ये एक चहा चा हॉटेल लागले लगेच सर्व जन आत घुसले ... मस्त पैकी चहा आणि बिस्किट्स वर ताव मारला. अजून थोडा थोडा म्हणत किमान आर्धा तास आशीच कठीण वाट आम्ही उतरत होतो .. पायाची वाट लागलेली होती .. पण मना मध्ये एक समाधान होता.. आम्ही आज शिवरायांच्या त्या पहिल्या राजधानीची माती आमच्या या माथ्यास लावून आलो ...

आतिशय अविसाम्रीनीय आशी हि आमची मोहीम आम्ही पार पडून परत गुंजवणे गावामध्ये आलो.

मित्रहो आपण शिवरायांना कधी बघितले नाही पण त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा साथीदार .. व साक्षीदार असलेला हा किल्ले राजगड आज याची देही याची डोळा बघितल्याचा आनंद सर्वांच्या मुखावर दिसून येत होता ..

"असा ट्रेक होणे नाही " बस या एका वाक्यातच या प्रवासाचे पूर्ण वर्णन करता येईल .. एका दिवसा मध्ये जगलेले हे क्षण नक्कीच पुढील आयुष्य साठी एक स्वाभिमानाची भावना आमच्या मनामध्ये पेटवून जाईल याची मला खात्री आहे.

सर्वांनी जाताना एकाच प्रश्न विचारला .. पुढची मोहीम कुठे ? नक्कीच शिवरायांच्या नावाने पेटवलेला हा निचायाचा महामेरू अखंडपणे आम्हाला आमच्या स्वत्वाची जाणीव करून देईल .. आम्हाला आमच्या गौरवशाली इतिहासाची जान करून देईल.. हि अखंड ज्योत आमच्या मना मना मध्ये सतत प्रज्वलित राहील ..

पुन्हा लवकरच भेटूया पुढील मोहिमे साठी ... तो पर्यंत जय महाराष्ट्र .. जय भवानी .. जय शिवराय




Wednesday, July 8, 2009

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?

पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्‍या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्‍याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?

पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्‍याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्‍याला फुलविण्याचा
दुसर्‍याला आनंद देण्याचा...

Tuesday, June 30, 2009

जिजाऊ .कॉम - मनोगत


जिजाऊ .कॉम - मनोगत

महाराष्ट्र कुलस्वामिनी आई तुळजा भवानी कृपे करुण आज तो सोनियाचा क्षण माझ्या जीवनात आला, तमाम मराठी माणसाचे आराध्य छत्रपति शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेव यांच्या पावन विचारांचा स्पर्ष माझ्या जीवनाला झाला

केवळ महाराष्ट्र नव्हे तर सबंध भारत तथा या विश्वातील मातृत्व ला आदर्श म्हणजे जिजाऊ माँ साहेब

साडे-तीनशे वर्ष यवनांच्या अत्याचाराने होरपळली जाणारी आमची ही माय भूमि, हिन् पशु यातना भोगनारा अवघा मराठी मुलुख , स्वाभिमान शुन्य तथा गर्द काळोखा बुडालेली आमची जनता, आपली निष्टा जुलमी गनिमाच्या पायाशी घालणारी आशी आमची वतनदार जहागीरदार यांची जमात

आशा कठिन समयी जाधावांची कन्या , शहाजी राजांच्या नावाने सौभाग्याच लेनं लावणारी जिजाऊ आपल्या डोळ्यात फक्त एकाच स्वप्न बघत होती... होय स्वराज्याच ते देखन स्वप्न !

ज्या काळामधें ना देवांच्या वर, ना धर्मावर, ना ही आपल्या बायका पोरांवर सुद्धा आपला हक्का सांगण्याची हिम्मत कोना मधे उरली होती तेंव्हा त्या माउलिने स्वंतंत्र, स्वाभिमानी स्वराज्याचे स्वप्न पाहण्याचे धाडस केले

तिच्या डोळ्यातिल ते धगधगते स्वप्न साकारन्या साठी जन्म घेतला तो शिवबाने

माँ साहेब जिजाऊ यानि आपल्या प्रखर आणि तेजस्वी विचारानी या स्वराज्याचा पहिला मावळा घडविला तो म्हणजे शिवबा याच शिवबाने सबंध अठरा पगड़ जातीच्या लोकांमधे जिजाऊ प्रेरित स्वभिमानाची अखंड ज्योति पेटाविली आणि त्याना ह्या स्वराज्याचा मावळा बनवले

सर्व जाती धर्माच्या आमच्या ह्या मावळ्यांच्या रक्तातून हे स्वराज्य निर्माण झाले अणि जिजाऊ माऊलिं ते देखन स्वप्न प्रत्यक्षात अवतरल

पुढे हेच स्वराज्य, आपला महाराष्ट्र धर्म आणि स्वाभिमान आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत टिकवला तो स्वराज्याच्या दुसऱ्या त्रपतिने जिजाऊंच्या शंभू बाळांने

त्या थोर मांऊलिने आपल्या प्रबळ इच्छाशक्तिने या मायभूमी मधे सामान्यांचा राज्य प्रस्थापित केल
प्रत्येका मधे शिवाजी- संभाजी घडविला म्हनुनच हे राष्ट्र आगदी खंबीर पनाने सह्याद्रीच्या रुपाने सार्या जगा समोर ताठ मानने उभे राहिले

पन आज याच सह्याद्रिला सुद्धा शरमेने आपली मान खाली घालावी लागत आहे आशा वेळी गरज आहे त्या जिजाऊ माऊली ची तो सह्याद्री आकांत करीत आहे महाराष्ट्र धर्माचा विसर सर्यानाच पडत आहे मग आशावेळी पुन्हा एकदा ते विचारांचे तेज पुंज आपल्या समोर आलेच पाहिजे आज एक शिवाजी अनेक अफजल खानाला मारू शकणार नाही त्या साठी आज प्रत्येका मधे शिवाजी संभाजी घडला पाहिजे आणि ते घडविन्याचि ताकत आहे फक्त जिजाऊ माँ साहेबांच्या विचारांमधे

हीच प्रेरणा आणि हच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हाला या भूमि मधे शेतकर्यांचे, कष्टकर्याचें आणि सामन्यांचे सुराज्य घडवायचे आहे
या थोर उद्देशानेच आम्ही मांड्लेला हा प्रपंच www.jijau.com

ह्या वेब साईट च्या माध्यमातून आम्हाला कोणताही नविन इतिहास कोणालाही शिकवायचा नाहीये , पन त्याच इतिहासतुं काय शिकन्या सारखे आहे हे मात्र अगदी ठामं पने सांगायचे आहे

ह्या साईट च्या निर्मितीचे सारे श्रेय मी आज वर ज्यांनी ह्या स्वराज्यबद्दल, जिजाऊ आई साहेबांबद्दल , शिवाजी महाराज तथा शंभू राजांबद्दल लिहून ठेवल आहे मी त्याना देतो आज वर उपलब्ध आसलेले सहित्य ,पुस्तके , सीडी या सर्वान्तुन गोळा केलेली मुठभर माहिती म्हणजे ही वेबसाइट

इतिहास हा नुसता पाठ्य पुस्तकाचा भाग ना राहता त्यातून प्रेरणा घेउन एक नवा इतिहास घडाविने हेच एक उदात्त ध्येय

सर्व लोकाना एकत्र जोडून काही तरी नविन घडविन्याचा प्रयत्न म्हणजे ही वेबसाइट

एक नव्या राष्ट्राचे - महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगुन विचारांची एक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे जिजाऊ.कॉम

माला खात्री आहे आपल्या स्वाभिमानाचे हे पेटलेले अग्निकुंड अखंडपने तुम्हा आम्हातिल तो मावळा कायम जिवंत ठेवील

आणि पुन्हा एकदा जिजाउं चे स्वप्न आम्ही मावळें प्रत्यक्षात उतरवून दाखवू

पुन्हा एकदा या सह्याद्रीच्या माथ्याला महाराष्ट्र धर्माचा पताका स्वाभिमानाने फडकवुन दाखवू !

जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय

अमोल सुरोशे (नांदापुरकर)