
क्षणात सारे बदलून गेले,
तिला पहिले अन-मन माझे हरवून गेले.
अशाच एका सायंकाळी
तिची आणि माझी पहिली भेट,
सोबतीला होता केवळ एकांत,
अन नजरेला भिडली नजर थेट.
भिर-भिरणारे मन माझे हे
झाले अगदी निवांत,
कशी असेल ती ? कोण असेल ती ?
ह्या प्रश्नाचे काहूर हि झाले शांत
लागताच चाहूल सुखाची मनाला
नवी पालवी जणू मनात फुटली,
जशी सुखाची भाग्य लक्ष्मी- तिच्या पावली जीवनात आली.
स्वप्न नवे .. नवे हे जीवन
आयुष्यात कायम राहो
असेच आमच्या सुखाचे हे सोनेरी क्षण !
- अमोल
No comments:
Post a Comment